भूल दिलेल्यांच्या प्रदेशात पावसाचे थैमान…सत्तेचे विकासगान
सत्यार्थी सगळे काही हाताबाहेर गेलेले आहे. पण कोणी कबूल करत नाही. हिशेब असा की, दणदणीत घोषणा द्या आणि उद्घाटने करा, जनता त्यात गुंगलेली राहील. इथे महाराष्ट्रात-मुंबईत-पुण्यात पावसाने कहर माजवला आहे, पण वर्तमानपत्रांत पानपानभर जाहिराती छापून येताहेत उ. प्रदेशाच्या विकासाच्या. जी राम जी नामक क्रांतिकारी योजनेच्या. हिशेब हा की, विकासाच्या प्रगतीच्या जाहिरातींची अहोरात्र मारा करत राहा….

